22/05/2018
“सावकाश होऊ द्या ”, असा काळजी व जिव्हाळ्याचा आवाज ऐकु आला नाही.
-
मी अंदाजे, २ री किंवा ३ री त असेल. *मुळशी तालुक्यातील जामगाव माझे गाव* उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की, आमचे घरचे कार्यक्रम अगदी ठरलेले असायचे.
सकाळी सकाळी दुध भाकरी चुरुन खाल्ली की, आमचा मोर्चा वळायचा नदीकडे.
तासनतास आम्ही नदीवर पोहायचो. पोहायचा कंटाळा आला की, तिथेच झाडा-झुडुपांमध्ये खेळायचो.
*उन्हाळ्यात करवंदाच्या पार्ट्या व्हायच्या*.खुप आहे, लहाणपणाविषयी लिहिण्यासारखे, ते पुन्हा कधीतरी. तर, ह्या सुट्ट्यामध्ये आमचा एक-दोन कार्यक्रम पक्के असायचे.
*पहीला म्हणजे बारशीचे जेवणाची पंगत* आणि दुसरा म्हणजे गावातील कुणाचेही *लग्नातील जेवणाची पंगत*. दोन्ही पंगतींमध्ये जेवायची मजाच लय भारी.
त्या काळी जेवणामध्ये पंच पक्वान्न नसायचे गावाकडे. वरण – भात, शाक भाजी, एखादा जिलेबीचा वेढा किंवा मुठभर कळी. (कळी माहित नाही असे शक्यच नाही). पण हे जेवण म्हणजे आजच्या काळातल्या बफेट पध्दतीला कधी ही भारी होते.
--
*पुर्ण लेख वाचण्यासाठी कृपया लिंकवर क्लिक करा.🙏*
https://goo.gl/1bjh92
नुकताच माझ्या एका मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसाला जाण्याचा योग आला. कार्यक्रम भलताच भारी होता. काय तो