01/09/2026
फरक खूप मोठा आहे
आशिया खंडातील क्रिकेट संघांवर नजर टाकली तर प्रत्येक संघाला काही ना काही समस्या भेडसावत आहेत. भारताला गोलंदाजांचे समर्थ पर्याय दिसत नसल्याची चिंता आहे तर बांगलादेशला सातत्यपूर्ण खेळाची. अफगाणिस्तान फक्त टी२० आणि एक दिवसीय सामन्यात ठसा उमटवत आहे तर श्रीलंकेचा एकमेव आशेचा किरण सोनल दिनुशा ठरतो आहे. सर्वात कठीण परिस्थिती पाकिस्तान संघाची झाल आहे. २ कसोटी गमावल्यावर संघातील ७ खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजीचा प्रशिक्षक दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. आणि आता निवड समितीचा सदस्य मिसबाह उल हकने आपल्याशी काहीही सल्लामसलत न करता संघात बदल केले गेले म्हणून राजीनामा दिला आहे.