Aamhi Shelarkar

Aamhi Shelarkar Amhi shelrkar is representing the village shelar.Our gym is pride of every shelarkar.

14/05/2026
विशेष सूचना सर्व शेलार ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक 12 मे 2026 ,मंगळवार रोजी भव्य हिंदू संमेलन संदर्भात ...
12/05/2026

विशेष सूचना
सर्व शेलार ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक 12 मे 2026 ,मंगळवार रोजी भव्य हिंदू संमेलन संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन श्री हनुमान मंदिर येथे सायंकाळी 5.30 ते 6. या वेळेत केले आहे तरीही सर्व तरुण पिढी, माता,भगिनी आणि पुरुष वर्गानं मोठ्या संख्येने उपस्थित रहावे हि नम्र विनंती.
टीप - धर्म रक्षणार्थ या संमेलनाचे आयोजन केले आहे.
जय श्री राम
आम्ही शेलारकर

लोणाडचे लोणादित्य मंदिर        ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील लोणाड गावामध्ये व त्याच्या जवळपासच्या प्रदेशात खूप प्...
07/05/2026

लोणाडचे लोणादित्य मंदिर

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील लोणाड गावामध्ये व त्याच्या जवळपासच्या प्रदेशात खूप प्राचीन पुरावशेष आढळून येतात. येथील एका टेकडीवर सहाव्या-सातव्या शतकातील लेणी आहेत.

इ. स. नऊ ते तेराव्या शतकापर्यंत उत्तर कोकणावर शिलाहार राजांची सत्ता होती. या काळात त्यांनी बांधून घेतलेल्या मंदिरांपैकी अनेक मंदिरे आज भग्नावस्थेत आहेत.

त्यापैकीच एक लोणादित्याचे शिवमंदिर लोणाडमध्ये आहे. हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलेली वास्तू आहे. कल्याण -भिवंडी भागातील मध्ययुगीन मुघल आक्रमणांमुळे या मंदिराची बरीच पडझड होऊन ते दुर्लक्षित झाले.

शिलाहार राजा अपरादित्यचा प्रधान मंगलय्या याचा पुत्र अन्नपय्या याच्या इ. स. ९९७च्या एका ताम्रपटामध्ये या मंदिरा साठी भादाणे गावाचा महसूल नेमून दिल्याचे म्हटले आहे. यावरून हे मंदिर किमान १ हजार २४ वर्षे प्राचीन असल्याचे म्हणता येईल.

लोणाड गावापासून एक किलोमीटर अंतरावरील चौधरपाडा गावातील मंदिरात एक शिलालेख असलेला गद्धेगळ (गर्दभ शापवाणी) आहे.

२४ जानेवारी १२४० रोजीच्या या शिलालेखात लोणाडचे नाव लवणेतट असे लिहिले असून मंदिराचा उल्लेख 'लोणादित्य' म्हणून केलेला आहे.

लोणाड मंदिराशी संबंधित अपरादित्य दुसरा याचा इ. स. ११८४ चा एक शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आहे. या शिलालेखावर चंद्र, सूर्य आणि शिवलिंग कोरलेले आहे. लेखामध्ये लोणाड गावातील दोन श्रेष्ठींची घरे जकातमुक्त केल्याचे लिहिले आहे.

लोणादित्य मंदिर गजरथावर असल्याचे शिल्पांकित केलेले आहे. मंदिराचा भार हत्तींनी आपल्या पाठीवर तोलल्याचा आभास होतो.

मंदिराचे अनेक अवशेष जवळपास विखुरलेल्या अवस्थेत इतस्ततः पाहायला मिळतात. त्यामध्ये गणपती, लज्जागौरी, मिथुन शिल्पे, मृदंगवादक, नृत्यांगना, यक्ष-किन्नर, पुष्पवृष्टी करणारी आकाश युगुले असे अनेक घटक दिसून येतात.

लोणादित्य मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची भूमिज त्रिदल पद्धतीची बांधणी आहे. आज अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून त्याचे मूळ प्रमाण आणि सौंदर्य याची कल्पना येते. गाभाऱ्यातील शिव पिंडी, त्याबाहेर अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे.

गाभाऱ्याचे शिखर नष्ट झाले असून छताचा काही भाग टिकून आहे.कोसळलेले अनेक नक्षीदार भाग, आमलक इ. सभोवताली दिसून येतात.गाभाऱ्यात शिवलिंग दीड मीटर खाली स्थापलेले असल्याने पायऱ्या उतरून जावे लागते.

संपूर्ण बांधकाम शुष्कसांधी असून आठ फूट उंची पाषाणी भिंती आहेत. द्वारपट्टीकेवर ललाटबिंबासह नऊ शिल्पे आहेत आणि छताला कमळाच्या आकृतीने सालंकृत केलेले आहे.

मंदिराच्या बाहेर महिषासूर मर्दिनी व गजासूर वधाची शिल्पे दिसतात. मंदिराच्या पश्चिमेस एक एकर क्षेत्रफळाचे मोठे तळे आहे. पूर्वी या तळ्याला घाट बांधलेला असावा, त्याचे दगड आता विस्कळीत अवस्थेत आढळतात.

इथून जवळच चौधरपाडा गावात एक शिवमंदिर आहे. सध्या ह्या मंदिराला रामेश्वर मंदिर म्हणत असले तरी याचे नाव सोमेश्वर किंवा षोम्पेश्वर असावे. शिलाहार राजा मल्लिकार्जुन याच्या वसई येथील इ. स. ११६२ च्या शिलालेखात एका शिवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख येतो.

मंदिराकरिता लोणावाटक येथील वाडी दान दिल्याची नोंद आहे. या मंदिरातील शिव पार्वतीची मूर्ती आणि शंकराची पिंड लोणादित्य मंदिरातील असून ती भूतकाळात तिथे स्थलांतरित केली असावी.

शिलाहारकालीन देखण्या परंतु उद्ध्वस्त अवस्थेतील हे स्थापत्य - लेणे एकदा आवर्जून पाहायलाच हवे.

-प्रवीण कदम, महाराष्ट्र् टाईम्स

https://www.facebook.com/share/1Cceb8Py9J/?mibextid=wwXIfr
02/05/2026

https://www.facebook.com/share/1Cceb8Py9J/?mibextid=wwXIfr

एक काळ असा होता की बॉलीवूडमध्ये मराठी कलाकार हलक्या फुलक्या भूमिका करत असत. नोकराच्या किंवा कुठल्यातरी साईड रोल मराठी कलाकारांना दिले जात असत आणि मराठी कलाकारही ते हसत हसत करत असत. त्यावरून मराठी कलाकारांची थट्टा केली जात असे. मराठी इंडस्ट्रीतील टॉपच्या कलाकारांना बॉलीवूडमध्ये चांगल्या भूमिका वाट्याला आल्याच नाहीत. . नोकर स्वयंपाकी इत्यादी भूमिका मराठी कलाकारांनी हिंदी सिनेमात केल्याचे पाहायला मिळते. पण काळाचा महिमा पहा. आज एक मराठी माणूस मराठी कलाकार आणि मराठी सिनेमातील कलाकार रितेश देशमुख. . या पठ्ठ्याने अख्ख बॉलीवुड मराठी सिनेमात आणले. राजा शिवाजी चित्रपटात बॉलीवूड मधले सगळ्या टॉपचे कलाकार घेण्यात आले आहेत. सलमान खान अभिषेक बच्चन बोमन इराणी फरदीन खान संजय दत्त. या नावांना देशात कोण ओळखत नाही परंतु रितेश देशमुख यांनी त्यांना मराठी मध्ये येण्यास भाग पाडलं.

पैशासाठी बॉलिवूड मध्ये नोकराची भूमिका करणारे एकीकडे आणि छत्रपतींसाठी त्याच बॉलिवूड च्या दिग्गजाना मराठीत यायला भाग पाडणारे रितेश देशमुख एकीकडे!!

दरारा तर आहे 🔥

Big shout out to my newest top fans! 💎Prashant Patil, Yash Singh, Mangesh Bhoir, U B Jadhav Jadhav, Sunil ShindeDrop a c...
23/04/2026

Big shout out to my newest top fans! 💎

Prashant Patil, Yash Singh, Mangesh Bhoir, U B Jadhav Jadhav, Sunil Shinde

Drop a comment to welcome them to our community, fans

19/04/2026

आई वाज्रेश्वरी माऊली पालखी सोहळा Aamhi Shelarkar fans

19/04/2026

आई वाज्रेश्वरी माऊली पालखी सोहळा

17/04/2026

अत्यंत तातडीचे: करांचे प्रचंड ओझे आपल्यावर येणार आहे! आणि याबद्दल कोणीही बोलत नाहीये!

सरकार १५ ते १७ एप्रिल दरम्यान होणाऱ्या संसदेच्या ३ दिवसांच्या विशेष अधिवेशनात 'मतदारसंघ पुनर्रचना विधेयक' (Constituency Delimitation Bill) सादर करत आहे. यामुळे लोकसभेच्या जागा **५४३ वरून ८१६** पर्यंत वाढणार आहेत. तसेच, सर्व राज्यांच्या विधानसभांमधील जागांमध्येही सुमारे ५०% वाढ होणार आहे.

यामुळे 'राजकीय परजीवींचा' (राजकीय व्यवस्थेवर पोसल्या जाणाऱ्यांचा) एक नवीन वर्ग निर्माण होईल, ज्यांना कायमस्वरूपी आणि नियमित पगार दिला जाईल; आणि या सर्वाचा आर्थिक बोजा **तुमच्यावर**—म्हणजेच करदात्यांवर—दरवर्षी, आणि तोही कायमस्वरूपी पडणार आहे!

हे 'मतदारसंघ पुनर्रचना विधेयक' **प्रत्येक राज्याच्या विधानसभेचा** विस्तार देखील सुमारे ५०% ने करणार आहे.

सध्या भारतभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ४,१२३ आमदार (MLAs) आहेत. यात ५०% वाढ करा. याचा अर्थ सुमारे २,००० हून अधिक नवीन आमदार वाढणार आहेत. याव्यतिरिक्त २७३ नवीन लोकसभा खासदार (MPs) वाढणार आहेत. तसेच, राज्यसभेच्या विस्ताराचेही काही परिणाम (आर्थिक बोजा) सोसावे लागतील. आणि या सर्वावर कडी म्हणजे—नवीन कर्मचारी, नवीन कार्यालये, नवीन सुरक्षा व्यवस्था, नवीन बंगले आणि पुढील ३०-४० वर्षे दिले जाणारे नवीन निवृत्तीवेतन (पेंशन्स) यांचाही खर्च आपल्यालाच उचलावा लागेल.

मग याबद्दल बातम्यांमध्ये चर्चा का नाही?
असा एकही राजकीय पक्ष नाही ज्याला या विधेयकाला विरोध करण्यात काही आर्थिक फायदा (किंवा स्वारस्य) असेल. यात नुकसान फक्त आपलेच होणार आहे—म्हणजेच करदात्यांचे.

एका खासदाराचा सरकारी तिजोरीवर पडणारा खर्च: ₹४.२९ कोटी/वर्ष (पगार + भत्ते + इतर सुविधा + संपूर्ण कुटुंबासाठी विमान प्रवासाचे विशेष भत्ते)
नवीन वाढणारे लोकसभा खासदार: २७३
केवळ या नवीन खासदारांचा वार्षिक खर्च: ₹१,१७१ कोटी/वर्ष
एका ५ वर्षांच्या कार्यकाळातील एकूण खर्च: ~₹५,८५५ कोटी

८१६ खासदारांच्या पूर्ण क्षमतेने चालणाऱ्या लोकसभेचा वार्षिक खर्च: ~₹३,५०० कोटी/वर्ष
+ राज्यांच्या विधानसभांचा विस्तार (४,००० हून अधिक नवीन आमदार): अंदाजे ₹५,०००–८,००० कोटी/वर्ष
+ नवीन संसद इमारतीची पायाभूत सुविधा, कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्थेचा वाढीव खर्च: ???

करदात्यांवर पडणारा ५ वर्षांच्या काळातील (किमान) अंदाजित खर्च: ₹४०,०००–५०,००० कोटींहून अधिक

आणि हा तर केवळ 'थेट' (प्रत्यक्ष) खर्च आहे. प्रत्येक खासदाराला (MP) खालील गोष्टीही मिळतात:

— दरवर्षी ₹५ कोटींचा MPLAD निधी (आता याला ८१६ ने गुणा)
— दिल्लीमध्ये भाडेमुक्त बंगला (बाजारमूल्य: दरमहा लाखो रुपये)
— स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आयुष्यभर मोफत रेल्वे + विमान प्रवास
— स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सुविधा
— केवळ एका कार्यकाळानंतर (term) दरमहा ₹३१,००० पेन्शन
— समर्पित कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि वाहने

केवळ MPLAD निधीचा विचार करता: ८१६ × ₹५ कोटी = दरवर्षी ₹४,०८० कोटी. हे केवळ "मतदारसंघ विकासासाठी" — असा निधी ज्याच्या वापराच्या देखरेखीचा (utilization tracking) अत्यंत सुमार आणि कुप्रसिद्ध असा इतिहास आहे.

इतकेच नाही, तर आपल्या 'गरीब' राजकारण्यांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यातील प्रत्येकाला केवळ ५ वर्षे "सेवा" केल्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळते.

आता — तुमच्या पैशांच्या बदल्यात तुम्हाला स्वतःला काय मिळते?

निवडून आलेल्या खासदारांपैकी ४६% जणांवर फौजदारी खटले दाखल आहेत. ९३% खासदार कोट्यधीश आहेत!

म्हणजेच, आपण अधिक पैसे मोजत आहोत; तेही त्याच-त्याच लोकांसाठी, जे काम मात्र त्याहूनही कमी करत आहेत.

**आयकर विवरणपत्र (ITR) भरणाऱ्या बहुतांश लोकांना हे सर्व घडत असल्याची पुसटशीही कल्पना नसते, कारण कोणतेही वृत्तवाहिनी याला 'प्राइम टाइम'मध्ये स्थान देत नाही — कारण त्या वाहिन्यांच्या मालकांचेही यात राजकीय हितसंबंध गुंतलेले असतात.**

एक त्वरित आणि वैयक्तिक वास्तव-पडताळणी (reality check): जर तुम्ही ३०% कराच्या टप्प्यात (tax bracket) येत असाल, तर या मार्चमध्ये तुम्ही भरलेल्या 'अग्रिम कराचा' (advance tax) एक मोठा हिस्सा अशा राजकारण्यांना निधी पुरवण्यासाठी वापरला जात आहे, जे वर्षातून केवळ ५५ दिवस संसदेत उपस्थित राहतात, ७ मिनिटांत कायदे मंजूर करतात आणि आता त्यांना असेच करणारे आणखी २७३ सहकारी मिळणार आहेत. हा मुद्दा 'डावे विरुद्ध उजवे' (Left vs Right) असा नाही. हा मुद्दा आहे 'करदाते विरुद्ध ती व्यवस्था', जिने तुमच्याच पैशांचा वापर करून — आणि तुम्हाला काहीही न विचारता — स्वतःसाठी प्रचंड मोठी वेतनवाढ मंजूर करून घेतली आहे.

**हा केवळ भाजप किंवा काँग्रेसशी संबंधित मुद्दा आहे, असा विचार करणे थांबवा. तसे मुळीच नाही. हा मुद्दा आहे 'करदाते विरुद्ध संपूर्ण राजकीय वर्ग' असा.** ज्या क्षणी तुम्ही याला पक्षीय स्वरूप देता, त्याच क्षणी तुमचा पराभव होतो — कारण तुम्ही ज्या दुसऱ्या पक्षाचे समर्थन करत आहात, तो पक्षही या विषयावर तितकाच गप्प आहे.

अंतिम विचार:

तुम्ही मार्चमध्ये अग्रिम कर भरला. तुम्ही जुलैमध्ये आयकर विवरणपत्र भरणार आहात. आणि तुम्ही दरमहा TDS (उगमस्थानी कर कपात) भरतच राहणार आहात. त्या पैशांचा एक मोठा हिस्सा आता राखून ठेवण्यात आला आहे — महामार्गांसाठी नाही, रुग्णालयांसाठी नाही, की IITs साठीही नाही — तर सुमारे २,३०० हून अधिक नवीन राजकारण्यांचे पगार, बंगले, मोफत विमान प्रवास, MPLAD निधी, निवृत्तीवेतन, कर्मचारी वर्ग आणि सुरक्षा यांवर खर्च करण्यासाठी. हे राजकारणी वर्षाकाठी एकत्रितपणे केवळ २० ते ५५ दिवसच अधिवेशनासाठी उपस्थित राहतील, एका तासाच्या आत कायदे संमत करतील आणि उर्वरित बहुतांश वेळ मात्र गैरहजरच राहतील.

त्यांनी तुम्हाला विचारले नाही. आणि त्यांना विचारण्याची गरजही नाही. तसेच, त्यांच्या कोणत्याही विरोधकांकडूनही त्यांना रोखले जाणार नाही.

तुम्ही किमान एवढे तरी करू शकता की, या गोष्टीबद्दल इतरांना जागृत करावे.

कृपया ही माहिती सर्वत्र — Facebook, WhatsApp समूह, LinkedIn — अशा प्रत्येक ठिकाणी शेअर (Cross-post) करा. सर्वाधिक कर भरणारा जो पगारदार वर्ग आहे, तोच राजकीयदृष्ट्या सर्वाधिक अलिप्त (disengaged) आहे. आणि सध्या याच अलिप्ततेचा गैरफायदा घेतला जात आहे.@

Address

Shelar
Bhiwandi
421302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamhi Shelarkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share